रत्नागिरी जिल्हा
रत्नागिरी जिल्हा
फलोत्पादन जिल्हा म्हणून नावारूपाला आलेला रत्नागिरी जिल्हा येत्या काही वर्षात पर्यटन जिल्हा म्हणून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे, श्री स्वामी स्वरूपानंद पावस या तिर्थक्षेत्रांमुळे रत्नागिरीचे नाव जागतिक नकाशावर गेले आहे. त्यात रत्नागिरीचा हापूस म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करून पर्यटकांना भूरळ घातली आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने जागतिक स्तरावरील पर्यटक रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेट देत असतात. जिल्ह्याला विस्तीर्ण अशा समुद्र किनारपट्टी लाभली असून, जयगड, बाणकोट, रनपार आदी बंदरे उद्योगातून विकसीत होत आहेत. अनेक समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. नगररत्नांची खाण असलेला हा जिल्हा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून आहे.
बाणकोट - रत्नागिरीतील उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे बाणकोट. खाडीकाठी वसलेले हे गाव. ब्रिटीश काळापासून या गावाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख खाड्यांपैकी बाणकोटची खाडी ही प्रमुख खाडी असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खननाचा उद्योग चालतो.
वेळास - नाना फडणिसांचे मूळ गाव म्हणून इतिहासात नोंदले गेलेले हे गाव म्हणजे वेळास. अत्यंत निसर्गरम्य असे हे गाव असून नारळ, सुपारी, हापूस आदी उत्पादने येथील प्रसिध्द आहेत. गावात दुर्गामातेचे मंदिर असून, याठिकाणी उत्तम शिल्पकला असलेली श्री कालभैरव, रामेश्वर, राम व वाघ्रेश्वर आदी देवळे आहेत.
केळशी - निसर्गसौंदर्याने नटलेले हे सुंदर गाव असून पर्यटकांना आकर्षित करणारा असा हा परिसर आहे. क्रांतिवीर वासूदेव फडके यांचे हे मूळ गाव. मराठेशाहीतील नामवंत सरदार फडके, केळकर, लागू हेदेखील याच गावचे. लोकमान्य टिळकांचे आजोळ देखील केळशीचे. याठिकाणी अनेक स्थळे प्रसिध्द आहेत. त्यामध्ये केळशीची महालक्ष्मी, याकूब बाबांचा दर्गा, पांढरा गणपती, श्री कालभैरव मंदिर, बेलेश्वर मंदिर, वाळूचा डोंगर, विश्वेश्वराचे देऊळ, दांडीचा वड, उटबरकरीण, आतगावचा टेप, खडप आदींचा समावेश आहे.
आंजर्ले - जिल्ह्यातील दापोली तालुक्यात समुद्रकिनारी वसलेले हे छोटे गाव. लांबच लांब व अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा या ठिकाणी असून, नारळ, सुपारीच्या anjerliहिरव्यागार बागा येथे आहेत. पर्यटकांना भूरळ घालणारे असे हे गाव. आंजर्ल्याची खाडी, आंजर्ल्याचा समुद्रकिनारा, कड्यावरचा गणपती, मुर्डी, श्री दुर्गादेवीचे मंदिर आदी ठिकाणी अत्यंत नयनरम्य अशी आहेत.
हर्णे- जिल्ह्यातील प्रमुख बंदर म्हणून नावारूपाला आलेला हा परिसर. पुरातन काळापासून हे गाव वाहतुकीसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय चालतो. हर्णे गावाचे महत्व ओळखून या ठिकाणी जलदुर्गाची निर्मिती करण्यात आली. सुवर्णदुर्ग असे या किल्ल्याचे नाव असून, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख स्थान होते. या जलदुर्गाच्या बाजूला असलेला भुईकोट किल्लाही पर्यटनासाठी चांगला आहे.
मुरूड - महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मूळ गाव. आज हेच गाव पर्यटनाच्या नकाशावर आले आहे. पर्यटनाच्यादृष्टीने हे गाव अत्यंत सुंदर असून, या ठिकाणी पर्यटन महामंडळाच्यावतीने व्यवस्थाही करण्यात आली आहे.
आसूद - दरी डोंगरांमध्ये वसलेले हे छोटे गाव असून, या ठिकाणी निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. आसूदचा लाकडी पूल ‘गारंबीचा बापू’ ने अजरामर केले. याशिवाय केशवराज मंदिर हेही पाहण्यासारखे आहे. पर्यटनासाठी हा गाव खूपच सुंदर आहे.
दाभोळ - दापोली तालुक्यातील आणखी एक महत्वाचे बंदर. एन्रॉनमुळे हे गाव जागतिक नकाशावर आहे. दाभोळला ऐतिहासिक महत्व असून, पूर्वापार व्यापार उदिमासाठी ते प्रसिध्द आहे. या ठिकाणी दिपगृह, दाभोळचा धक्का, दाभोळची चणकाई आदी ठिकाणी पाहण्यासारखी आहेत.
दापोली - मिनी महाबळेश्वर म्हणून नावारूपाला आलेले हे शहर म्हणजे दापोली. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, या ठिकाणी अनेक स्थळे पर्यटकांना नेहमीच भूरळ घालतात. दापोली कृषि विद्यापीठामुळे या शहराला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील अनेक मंडळी ओळख त्यानिमित्ताने होते. दापोलीत अनेक स्थळे पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत. त्यामध्ये एक म्हणजे चिखलगाव. लोकमान्य टिळकांचे हे मूळ गाव. चिखलगावप्रमाणे ऐतिहासिक महत्व असलेले दुसरे गाव म्हणजे पालगड. परमपुज्य साने गुरूजींे हे मूळ गाव. याशिवाय लाडघर, करसगाव आदी ठिकाणेही नयनरम्य व सुंदर आहेत. त्यामध्ये शहरातील तलाव, लक्ष्मीकेशव मंदिर, लेणी, आयनी, मेट, भोस्ते घाटी, महितपगड, सुमारगड, रसाळगड अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
चिपळूण - जिल्ह्यातील प्रमुख शहर. लोटेतील औद्योगिकीकरणामुळे हा परिसर नावारूपाला आला आहे. वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले गाव असून, या ठिकाणी अनेक स्थळे parshuramपाहण्यासारखी आहेत. त्यातील प्रामुख्याने प्रसिध्द असे ठिकाण म्हणजे परशुराम. भगवान परशुरामाचे कोकणातील सर्वात प्रसिध्द देऊळ या गावामध्ये आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. याशिवाय सवतसडा, गोवळकोट किल्ला, विंध्यवासिनीचे मंदिर, गांधारेश्वर, डेरवण, दोणवली, करंजेश्वरी, रामतीर्थ आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहे. डेरवण येथील शिवसृष्टीचा देखावा पर्यटकांना भूरळ घालतो. कोयनानगर - जलविद्युत प्रकल्पामुळे नावारूपाला आलेले हा परिसर. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पातून होते. त्यामुळे हा प्रकल्प पाहण्यासाठी असंख्य पर्यटक दरवर्षी येत असतात. हापरिसर अत्यंत सुंदर असा आहे. सह्याद्रीच्या खोर्यात हे ठिकाण असल्याने गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे. या ठिकाणी कोयना धरण, कोयना अभयारण्य आदी ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
गुहागर - अत्यंत नयनरम्य असा समुद्रकिनारी वसलेले हे छोटेसे गाव. नारळी-पोफळीच्या बागांनी सजलेले हे गाव पर्यटकांना पाहण्यासारखे आहे. शांत, सुंदर असा हा परिसर असून, याठिकाणी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. तालुक्यातील हेदवी येथील दशभुजा गणपतीचे मंदिर अत्यंत सुंदर असे आहे. लक्ष्मीगणेशाचे हे देवस्थान प्राचीन असून, अत्यंत दुर्मिळ देवतांपैकी एक आहे. गुहागरचा समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. सायंकाळी या ठिकाणी सुर्यास्त पाहणे हेहीएक आकर्षण असते. याशिवाय दुर्गामातेचे मंदिर, उरफाटा गणपती, व्याडेश्वर, वेळणेश्वर आदी ठिकाणी सुंदर आहेत. वेळणेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर सुंदर असे आहे. याशिवाय रानवी, विजयगड आदी ठिकाणे पर्यटनासाठी चांगली आहेत.
संगमेश्वर - मुंबई-गोवा महामार्गावरील मुख्य ठिकाण. या तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांना संगमेश्वर येथील कसबा याठिकाणी अटक झाली. याठिकाणी असलेला प्रचितगड पर्यटकांना भूरळ घालतो. ट्रेकिंगसाठी हा गड अत्यंत चांगला आहे. याशिवाय या ठिकाणी अत्यंत प्राचीन अशी मंदिरे आहेत. त्यामध्ये कर्णेश्वर मंदिर, सूर्यनारायण मंदिर, आमनायेश्वर मंदिर, जाकमाता मंदिर, विष्णूमंदिर आदींचा समावेश आहे. धोदवणे तिवरे धबधबादेखील पर्यटकांना भूरळ घालणारा आहे.
मार्लेश्वर - संगमेश्वर तालुक्यातील महत्वाचे देवालय, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी हे ठिकाण अत्यंत चांगले आहे. तेथील मार्लेश्वरचे मंदिर तर प्रसिध्द आहे. या मंदिरात आपल्याला नागांचे दर्शन घडते. मंदिराजवळ असलेला धारेश्वर हा धबधबा पर्यटकांना भूरळ घालणारा आहे. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. याशिवाय महितपगड, विशाळगड आदी ठिकाणे पर्यटनासाठी चांगली आहेत.
रत्नागिरी - जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण, पर्यटनाच्यादृष्टीने रत्नागिरी शहर विकसीत होऊ लागले आहे. रत्नागिरीत अनेक स्थळे पर्यटनाच्यादृष्टीने विकसीत होत आहे. ऐतिहासिक वारसा असलेले हे शहर. या ठिकाणी अनेक स्थळे पर्यटकांना भूरळ घालणारे आहेत. त्यामध्ये अठरा हाताचा गणपती, पतितपावन मंदिर, पांढरा समुद्र, काळा समुद्र मिरकरवाडा बंदर, भगवती किल्ला, श्रीदेव भैरी विठ्ठल रखुमाई मंदिर, मत्स्यालय, लाल गणपती, थिबा पॅलेस, थिबा पॉईंट, लोकमान्य टिळक जन्मस्थान आदींचा समावेश आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे ganpatipuleजगप्रसिध्द असे हे ठिकाण असून, पर्यटन स्थळ म्हणून ते आता नावारूपाला आले आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या क्षेत्राची ओळख असून, दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. समुद्रकिनारी हे मंदिर वसलेले असून, पर्यटकांना भूरळ घालणारे असे हे पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने हा परिसर विकसित केला जात असून, शासनाकडूनही या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात आले आहे.
मालगुंड -कवी केशवसुतांचे हे गाव. कवी केशवसुतांचे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले असू, श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी येणारे पर्यटक, भाविक मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारकालाही भेट देत असतात. पर्यटकांना आकर्षित करणारे असे हे ठिकाण आहे. प्राचिन कोकणची ओळख पर्यटकांना करून देणारा प्रकल्प पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. गणपतीपुळेजवळच हा प्राचिन कोकणचा प्रकल्प उभा राहिला असून, डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हे प्राचिन कोकण वसविण्यात आले आहे.
जयगड बंदर व किल्ला - रत्नागिरीतील महत्वाचे ठिकाण. वाहतुकीसाठी सुरक्षित असे हे बंदर असून, या ठिकाणी जिंदाल वीज प्रकल्पामुळे हा भाग नावारूपाला आला आहे. येथील कर्हाटेश्वर मंदिर भाविकांचे श्रध्देचे ठिकाण आहे. जयगड किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेला हा भाग पर्यटकांना भूरळ घालणार असा आहे.
पावस- श्री स्वामी स्वरूपानंद मंदिरामुळे जागतिक नकाशावर आलेले हे ठिकाण. या मंदिराला भेट देण्यासाठी तसेच स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात. श्री क्षेत्र गणपतीपुळे बरोबरच पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर तिर्थक्षेत्र म्हणून विकसीत केले जात आहे.
गणेशगुळे - हे देवस्थान महागणपतीचे असून, ते गणेशगुळे गावात अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.
गणपतीपुळे हे ठिकाण कोणाला माहित नसेल असे होणे शक्य नाही! तरी पण आज हि पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे अलीकडेच मी रत्नागिरीला काही कामास्तव गेलो असताना अचानकच माझ्या नातेवाईकाने “चल आज तुझ्या डोळ्याचे पारणे फेडूया ” असे म्हणून गणपतीपुळ्याला जाण्याचा बेत आखला. त्याचे हे वाक्य ऐकून मी जरा गोंधळूनच गेलो होतो आणि उगाचच भीती पण वाटत होती कि आता हा माणूस आपल्याला काय काय करायला लावणार आहे देव जाणे!
नंतर काही वेळाने मी विचारलं तेव्हा तो म्हणाला कि आपण आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळ्याला जाणार आहोत. तेव्हा मला कळल कि आज काहीतरी वेगळा अनुभव घेता येणार. तसा मी गणपतीपुळ्याला वेगळ्या रस्त्याने म्हणजेच निवळी फाट्याने गेलो होतो, हा निवळी फाटा मुंबईहून कोंकणात जाताना हातखाम्ब्याच्या अलीकडे मुंबई-गोवा रस्त्यावर लागतो. निवळी फाटा ते गणपतीपूळे ( इथून पुढे पुळे असा उल्लेख करतो) हे अंतर २७ ते ३१ किमी आहे, हा रस्ता तसा सरळच गावागावातून गणपतीपुळ्यात पोहचतो. असो, आता आरे-वारे हा काय प्रकार आहे ते लिहिण्याची आता वेळ आली आहे.
रत्नागिरी शहरातून पुळ्यात जाता येते, अलीकडेच आरे-वारे ह्या दोन गावांमधून जाणार नवीन रस्ता बांधण्यात आलेला आहे. मुंबई-गोवा रस्त्यावरून रत्नागिरी शहरात जाण्यासाठी हातखंबा ह्या फाट्यावरून वळण घ्यावे लागते. आत शिरल्यावर रत्नागिरी शहराची भव्यता लक्षात येते, ह्या शहरात सध्या मोठी-मोठी सरकारी कार्यालये आहेत, तसेच हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे मोठी बाजारपेठ, भव्य एस.टी. स्थानक देखील आहे, तसेच देशातल्या कोणत्याही भागातून कोकण रेल्वे मार्गाने इथे पोहोचता येते.
एकदा का हातखंबा तिठयावरून आत शिरलात कि सरळ सरळ रत्नागिरी शहरातून गाडी हाकत न्यायची, वर म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीचे शहरीकरण तुमच्या दृष्टीस पडत राहील. मारुती मंदिर चौकातून सरळ पुढे आल्यावर एस.टी. महामंडळाचे वर्कशौप उजव्या हाताला लागेल तिथून पुढे गेल्यावर रात्नागिरी एस.टी. डेपो दिसेल., इथून पुढे गेलात कि तिसरया उजव्या वळणाला (होटेल रुद्र समोरील रस्ता ) आत वळले
इथून पुढे जाताना अजून एक छोटेखानी मारुतीचे मंदिर लागेल, मग सावरकरांचा पुतळा असलेले चौक ओलांडले कि बँक ऑफ इंडिया वरून सरळ पुढे जाऊन फाटक हाईस्कूल लागते. तीथून पुढे सरळ गेल्यावर थोड्या अंतरावर छोट्याश्या वहाळावरचा पूल ओलांडून पुढे निघालो कि लगेचच एक चार रस्ता असलेला चौक लागेल, चौकातून सरळ पुढे गेल्यावर खऱ्या अर्थाने गणपतीपुळ्याच्या आरे-वारेतून जाणारया रस्त्याचा प्रारंभ होतो. इथून मात्र मासळीच्या वासामुळे, समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे आपल्याला समुद्राच्या सोबतीची जाणीव व्हायला सुरुवात येते. काही अंतरापर्यंत रस्त्याच्या एका बाजूला कोळी बांधवांची घरे दिसतात तर दुसऱ्या बाजूला समुद्राचे आट घुसलेले पाणी तसेच त्या पाण्यात मासे पकडण्यासाठी टाकलेली छोटी-मोठी जाळी दिसत राहतात. नंतर काहीश्या छोट्या उंचीच्या खाऱ्या पाण्यातील झुडुपांमधून हा रस्ता पुढे जात राहतो, अधून मधून छोट्या घरांची सोबत असतेच. मग हा रस्ता छोटी-मोठी वळण घेत थोड काळजीपूर्वक उजव्या हाताचे वळण घेतो आणि सरळ पुढे जात राहतो तो थेट आरे गावाला जोडणाऱ्या पुलापर्यंत. समुद्राच्या आत शिरलेल्या पाण्यावरील पूल पार केला कि आपण आरे ह्या गावात शिरतो, पुढे जाताना लागणारे डाव्या हाताचे वळण सोडून पुढे गेल्यावर मात्र उजव्या हाताचे वळण घ्यावे लागते.
कोळीसरे येथील श्री भगवान महाविष्णूंचे देवस्थान पाहण्यासारखे आहे. निवळीचा धबधबा तर पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. करबुड्याचा रेल्वे बोगदा हा आशियातील सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जातो. याशिवाय पूर्णगड किल्ला, नाणिज, पानवालचा रेल्वे पूल आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
लांजा - लांजातील श्रीकालभैरव योगेश्वरी मंदिर, कोटचा सिध्दीविनायक, वनसुळे, एकखांबी गणपती मंदिर, लक्ष्मीकेशव देवस्थान, मल्लिकार्जुन आदी ठिकाणे सुंदर आहेत.
राजापूर - ऐतिहासिक महत्व असलेले हे गाव. राजापूरच्या गंगेमुळे धार्मिकदृष्ट्या नावारूपाला आलेले हे गाव. दर तीन वर्षांनी येणार्या गंगेसाठी राजापूर प्रसिध्द आहे. याशिवाय आडिवर्याची महाकाली, धूतपापोश्वर मंदिर, यशवंतगड, कनकादित्य, आर्यादुर्गा देवस्थान, अंजनेश्वराचे देऊळ आदी ठिकाणे सुंदर अशी आहेत. त्यामुळे पर्यटकांबरोबरच भाविकांची या ठिकाणी गर्दी होते.
Comments
Post a Comment